संस्थेबद्दल

इवलेसे रोप लावलीये दारी या उक्तीची साक्षात प्रचीती यावी असेच आमच्या संस्थेबाबत घडले आहे. सन १९९३ साली अंकुरलेल्या या बीजाचा वेलू २५ शाखांच्या माध्यमातून विस्तारला, बहरला, स्थिरावला इतकेच नव्हे तर, त्याच्या सानिध्यात येणार्यांना तो कल्पवृक्ष वाटावा असे म्हणन्या इतकी सक्षम वाटचाल असणाऱ्या सहकार क्षेत्रात विशेषतः अर्थ क्षेत्रात अनेकांना पारदर्शक ठरावी अशा विधायक उपक्रमांसह अर्थपूर्ण सेवा देणाऱ्या या संस्थेविषयी...

समाज्यामध्ये सदाचार, सद्भावना-सामंज्यस्य–संयम-समता या सहकाराच्या अमृतगंधाची उधळण करणाऱ्या स्वर्गीय वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची चिरंतर कार्यस्मुर्ती म्हणून या संस्थेची स्थापना २६ मे १९९३ मध्ये वीराचार्यांच्या सेवेचा वसा आणि वारसा लाभलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सेवाभावी कार्यकर्ते संचालक, समाजहिताचा विचार, कार्यप्रनव कर्मचारी, जाणते सभासद, कुशल व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि विधायक प्रवृत्ती अशा अनेकविध सुयोग्य बाबींच्या सहयोगाने संस्थेची अर्थकारणातील वाटचाल ही सातत्याने प्रगतीपथाकडे राहिलेली आहे, इतकेच नव्हे तर कसोटीच्या क्षणांवर आम्ही धैर्याने मात केली आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो आहे.

आर्थिक संस्थेला विशेषतः व्यावसाईक पतसंस्थेला विधायक उपक्रमांची जोड देऊन एक अर्थपूर्ण संकल्पना वीराचार्य पतसंस्थेच्या माध्यमातून समाजासमोर साकारताना शैक्षणिक, आरोग्य, वृक्षारोपण जलसंधारण, व्यसनमुक्ती, क्षारपड आदी सामाजिक बाबींच्या जाणीव जागृती मधील संस्थेचा सहभाग हा भरीव ठरावा असा आहे. अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी ही पतहीनांना पतवान बनविण्याच्या पतसंस्थेच्या उद्धेशा इतकीच महत्वाची ठरावी असे वाटते. म्हणूनच पतसंस्था संचलनात आर्थाकाराना इतकेच प्राधान्य समाजकारणाला दिले गेले आहे.

- एन. जे. पाटील
संचालक,
वीराचार्य पतसंस्था, सांगली