सामाजिक बांधिलकी
वीराचार्य पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहार करत नाही, तर समाजाप्रती आपली जबाबदारी मानते.
संस्था करत असलेले सामाजिक कार्य

दिव्यांग सहाय्यता
संस्थेच्या वतीने दिव्यांग श्री. सुनिल सूर्यवंशी, वसगडे यांना सुकर वाटचालीसाठी तीन चाकी सायकल प्रदान.

जयपूर फूट (कृत्रिम पाय) वाटप
अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या प्रयत्नातून गेली ११ वर्षे, प्रतिवर्षी तीन जयपूर फूट (कृत्रिम पाय) चे नियमित वितरण.
.jpg&w=3840&q=75)
वृक्षारोपण
महाराष्ट्र शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड अभियानामध्ये संस्थेच्या वतीने दंडोबा डोंगर, ता. मिरज येथे ५००० रोपांचे वृक्षारोपण.
.jpg&w=3840&q=75)
अनाथाप्रती आपुलकी
संस्थेच्या वतीने दीपावलीच्या प्रथम दिनी वेलणकर अनाथाश्रम, सांगली येथील मुलींना फराळ व साहित्याचे वाटप.

क्षारपड जमीन सुधारणा सहाय्य
संस्थेच्या वतीने शाखा समडोळी येथील शेतकरी बांधवांच्या क्षारपड जमिनी पिकाऊ बनविण्यासाठी आर्थसहाय्य.

जलसंधारणासाठी सहकार्याचा हात
महात्मा फुले जलसंधारण योजनेसाठी सहाय्य केलेल्या खंडेराजुरी पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी भरीव कार्य.

पुरग्रस्तांना मदतीचा हात
महापुराच्या काळात पुरग्रस्तांना संस्थेमार्फत मदतीचा हात मानून भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
.jpg&w=3840&q=75)
दुष्काळग्रस्तांना चारा वाटप
मा. जिल्हा उपनिबंधक यांच्या आवाहानुसार दुष्काळग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थेकडून प्रथमच दहा ट्रक चारा व पशुखाद्याचे वितरण.

व्यसनमुक्ती
संस्थेचे सर्व संचालक व सेवक वर्ग पूर्णतः व्यसनमुक्त आहेत. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनपर रंगीत पोष्टरचे प्रकाशन, व्यसनमुक्ती व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमात सहभाग.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे दत्तक पालक योजना
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे दत्तक पालक योजनेअंतर्गत २५ गरीब विद्यार्थिनींचा गुणात्मक संवर्धन आणि शैक्षणिक अभिवृद्धीसाठी गत १८ वर्षापासून सातत्याने सहकार्याचा हात.
संस्कारशील पुस्तक प्रकाशनास मदत
संस्कारशील पुस्तक प्रकाशनास मदत – बाल मनावरील सुसंस्कारासाठी उपक्रमात संचालक व सेवकांचा कृतीशील सहभाग व उपयुक्त साहित्य प्रकाशनास भरीव मदत.
सामाजिक कृतज्ञता निधी
सामाजिक कृतज्ञता निधीतून सामाजिक कृतज्ञतेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था व व्याधी पिडीत रुग्णांना आर्थिक मदत.
सहकाराला सहकार्याचा हात
सहकाराला सहकार्याचा हात- या उद्धेशाने सांगली जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम पतसंस्था विलीनीकरणाची प्रक्रिया राबवून दुधगाव, नांद्रे व भोसे येथे शाखा सुरु.