वीराचार्य जीवन सुरक्षा योजना

फक्त एक हजार रुपयात आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा!

योजनेची माहिती

संस्थेने आपल्या सभासदांसाठी वीराचार्य जीवन सुरक्षा योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संस्थेचा सभासद असणे आवश्यक आहे. फक्त एक हजार रुपये भरून या योजनेचा सदस्य बना आणि आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुरक्षित करा.

योजनेचे फायदे

  • आपली जीवन सुरक्षा
  • कोणत्याही अटीशिवाय योजनेचा लाभ
  • साधी, सरळ व सोपी प्रक्रिया
  • आपल्या पश्चात वारसांना लाभ
  • वयाच्या ६० वर्षापर्यंत योजनेचा लाभ
  • फक्त एकदा गुंतवणूक व कायमस्वरूपी लाभ
  • वयाच्या ६० वर्षानंतर रक्कमेचा परतावा

कसे सहभागी व्हावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, फक्त एक हजार रुपये भरून सदस्य बना. सभासदाचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसास पन्नास हजार रुपये मिळतात. सभासदाच्या वयाच्या ६० वर्षा पर्यंत ही योजना लागू असेल. वयाच्या ६० वर्षानंतर सभासदांना या योजनेचे एक हजार रुपये परत मिळतात.